जिल्ह्यातील भूमिपूत्र तहसीलदारांची एटापल्लीत निधन

jalgaon-digital
1 Min Read

कर्जत (प्रतिनिधी) –  कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथिल रहिवाशी तहसीलदार सुभाष यादव यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एटापल्लीचे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.

अहेरी येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. घरी असतानाच यादव यांना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक ह्रदयविदाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना साधारणतः दुसरा झटका आला आरि त्यातच काहीही करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

सुभाष रोहिदास यादव हे 31 वर्षीय तरूण तहसीलदार मुळचे अहमदनगर जिल्हातील कर्जत येथील रहिवासी. ते विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे. यादव हे सन 2014 च्या तुकडीतील नायब तहसीलदार असून तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे प्रशासकीय सेवा देऊन 13 सप्टेंबर 2019 ला पदोन्नतीने एटापल्ली येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले. मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना प्रेमाची वागणूक, प्रशासनातील कर्तृत्व उत्तम, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनामुळे ते सर्वांचे आदरनिय झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *