मुंबई – वाधवान कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते ते पत्र कोणाच्या दबावाखाली न देता मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
तसेच या प्रकरणी रविवारी दुपारच्या सुमारास सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपील वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले असून त्यांचे कुटुंबातील इतर लोकांना होम क्वॉरन्टीन् केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.