इतर जिल्ह्यात जाणार्‍या प्रवाशांचा निर्णय तहसीलदार घेणार

jalgaon-digital
1 Min Read

तात्काळ कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांनी केले प्राधिकृत

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे नगर जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित आणि इतर नागरिकांचे राज्यांतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होत आहे. या अर्जाच्या परवानगीसाठी तहसिलदार तथा घटना व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात राज्यांतर्गत इतर जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी प्राप्त होणार्‍या अर्जावर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाहीसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील प्रवाशांसाठी निर्गमित करण्यापूर्वी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे. त्यांच्या कार्यक्षेत्रात प्राप्त होणार्‍या अर्जानुसार जिल्हानिहाय याद्या तयार कराव्यात. अशा सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून तसे प्रमाणपत्र प्राप्त करून संबंधित व्यक्तीकडे देण्याचे नियोजन करावे. अशा प्रवाशांना ज्या जिल्ह्यात जायचे आहे, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा प्राधिकृत अधिकारी यांची आवश्यक ती परवानगी असल्याची खात्री करावी.

ज्या प्रवाशांना जाण्यासाठी स्वतःच्या वाहनांची व्यवस्था नसेल अशा परिस्थितीत संबंधित आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन, मंडळ यांचेशी समन्वय साधून अशा प्रवाशांना संबंधित जिल्हयात पाठविण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. प्रवासी बसेसचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टंसिंगसह प्रवासी व्यक्तींची आसन व्यवस्था आदी बाबींची सुयोग्य खात्री करून बसेस रवाना करण्याची कार्यवाही करावी. अडकलेले मजूर, भाविक, विद्यार्थी, पर्यटक यांना अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी प्राधान्य द्यावे. कुठल्याही परिस्थितीत वैयक्तिक पासेस देण्यात येवू नयेत, असे आदेशात नमूद केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *