मुंबई – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदीची घोषणा केली आहे. अनेक गरजू लोकांसाठी अनेक स्तरातून मदत येते आहे. त्यातच बिस्कीट मधील जुनी कंपनी पार्लेने देखील मदतीचे हात पुढे करत संचारबंदीसंपे पर्यंत देशभरात ३ कोटी बिस्कीट पुडे वाटणार आहे.
संचारबंदी दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पार्लेने पुढाकार घेत, पुढील ३ आठवड्यात ३ कोटी बिस्कीट वाटणार असल्याचे ट्विटर वर जाहीर केले.