मुंबई – कोरोनविरुद्धच्या लढाईसाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावे. तसेच येणाऱ्या काही दिवसात असणारी महावीर जयंती, हनुमान जयंती व शब्ब-ए-बारातसाठी नागरिकांनी घराच्याबाहेर पडू नये व यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केले आहे.
राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देशाच्या अस्तित्वाची लढाई असल्याने कायदे व आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.