नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती अर्थकारणाचे केंद्र समजले जाते. याठिकाणी अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्गज शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील असतात. रोजच्या रोज खेळता पैसा खिशात पडत असल्याने, पेठरोड, दिंडोरी रोड आदी भागात राहणाऱ्या झोपडपट्टीतील अशिक्षित, कमी शिकलेले स्त्री पुरुष काम करण्यासाठी येत असतात. येथील आडते, व्यापारी यांच्याकडे काम मिळवत आपला उदरनिर्वाह चालवितात. अशातच नाशिक बाजार समिती सुरवाती पासून गुन्हेगारीचा अड्डा बनले असून, बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना रिंगण करून मारहाण करणे, त्यांची लूटमार करणे यासह मोबाईल चोरीच्या घटना नियमित घडत असतात.