राज्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

मुंबई – राज्यामध्ये करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्च महिनाच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून 43.35 टक्के इतके झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) 11 वरून 17.5 दिवसांवर गेला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर 31 मार्च अखेर राज्यात 302 रुग्ण होते त्यातील 39 रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 12.91 टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात 10 हजार 498 रुग्ण होते. त्यातील 1773 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 16. 88 टक्के होते. 31 मे अखेर राज्यात 67 हजार 655 रुग्णांपैकी 29 हजार 329 रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत 43.35 टक्के एवढा झाला आहे.

राज्य शासन करित असलेल्या उपाययोजना, लॉकडाऊन, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्‍यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र शासनाने सुधारीत डिस्चार्ज धोरण जाहिर केल्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी 8000 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *