Friday, April 26, 2024
Homeनाशिकढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात: खरीपाबरोबर रब्बी हंगामाला बुरे दिन; करपा व मावा...

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात: खरीपाबरोबर रब्बी हंगामाला बुरे दिन; करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव

इगतपुरी | जाकीरशेख

तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पावसानंतर दररोज होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या व नुकतीच काढणी झालेल्या पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.

- Advertisement -

चालू वर्षी परतीच्या पाऊसासह अवकाळी पाऊसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात हाताशी आलेल्या भात, वरई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अवकाळी पाऊसामुळे शेतात सतत पंधरा दिवस पाणी साचले व नंतर पंधरा दिवस शेतात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठया प्रमाणात गवत झाले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी आहे तसे आवरून शेतातील गवताची साफसफाई करून शेती तयार करून गव्हू, हरभरा, कांदे व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.

अवकाळी पाऊसाच्या आठ दिवस आधी काही शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर पिकांची लागवड केलेली होती. ती पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी होती. तेव्हा शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्याानंतर औषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु आता या ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडून त्यांच्यावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याचे महागडी असे बियाणे आणून टाकले होते.

तालुक्यात किरकोळ प्रमाणात कांद्याचे पिक घेतले जाते. सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे बियाणे उगवून एक महीन्याचे झाले आहे. आता एवढया पंधरा दिवसात उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी वेळ आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप पिवळी पडून अगरे करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करुन रोपं व इतर पिके जगवण्याची धडपड करीत आहे.

दरम्यान, दरवर्षी नोंव्हबर महीन्यात थंडीत सुरवात होत असते व डिसेंबर महीन्यात मोठ्या प्रमाणात थंडी राहत असे ही थंडी रब्बी हंगामातील गव्हू, कांदे, हरभरा व भाजीपाला पिकासाठी पोषक असते. परंतु चालू वर्षी डिसेंबर महीना सुरु असला तरीही थंडीची चाहूल दिसत नाही. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर फारशी तेजी दिसत नाही.

गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे .या हवामानामुळे मावा, अळी बरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. हतबल होत शेतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन ती पिकावर फवारणी करत आहे.

– सतिश बांबळे, शेतकरी टाकेद

- Advertisment -

ताज्या बातम्या