Saturday, April 27, 2024
Homeनगरदिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय घेणार

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय घेणार

शिवराज पाटील : जिल्हा परिषदेत शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचार्‍यांचा दिव्यांगभूषण पुरस्काराने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिव्यांग व्यक्ती ही समाजाचाच एक भाग असून त्यांच्याप्रती संवेदनशील असणे हे समाजाचे कर्तव्य आहे. शासकीय सेवेत कार्यरत असलेले दिव्यांग कर्मचारीही आपल्या उत्कृष्ट कामाने ठसा उमटवत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद मिळतो. हे दिव्यांग कर्मचारी सर्वांसाठीच रोल मॉडेल आहेत. त्यांनी हे काम अशाच पध्दतीने कायम ठेवून दिशादर्शक बनावे. अपंगांच्या पदोन्नतीबाबतची प्रकरणे तातडीने निकाली काढून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.

- Advertisement -

राज्य शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जगातिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संघटनेच्यावतीने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांना दिव्यांभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मुख्य लेखा अधिकारी श्रीकांत अनारसे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, बापूसाहेब तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अनाप, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जपे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड, सचिव पोपट धामणे, संतोष सरवदे, रमेश शिंदे, उद्धव थोरात, राजेंद्र दुबे, किरण माने, राजेंद्र औटी, गजानन मुंडलिक, अमोल चन्ने आदी उपस्थित होते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले, आजचे सन्मानार्थी शरीराने दिव्यांग असले तरी कर्तृत्त्वाने शारीरिक सृदृढ व्यक्तींपेक्षा कांकणभर सरसच आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाची उंची खूपच मोठी आहे. प्रत्येक दिव्यांगामध्ये एक संवेदनशील मन असते. त्यामुळे शासकीय सेवेत ते मनापासून कर्तव्य बजावताना पाहायला मिळतात. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप म्हणाले, पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष आहे. दिव्यांग बांधव शासकीय सेवेत अतिशय निष्ठेने काम करतात. ग्रामीण भागात वाड्यावस्त्यावर जाताना होणारा त्रास विसरुन आपले विहित कर्तव्य बजावत असतात. आपल्या कामातून सर्वसामान्यांना मिळणारा आनंद शारीरीक वेदना विसरण्याची ताकद देतो. यावर्षी शासकीय सेवेतील 24 दिव्यांग कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केशव भांगरे आणि राजेंद्र साबळे (अकोले), रुक्मिणी बोरुडे (कर्जत), मदिना शेख (कोपरगाव), सुमित पेटकर (जामखेड), निलेश कांबळे (जामखेड), साहेबराव मले (नेवासा), मनीषा ताजवे (पारनेर), मिठू शिंदे (पाथर्डी), उषा सिनारे (राहाता), बाबासाहेब बोरसे (राहुरी), तुकाराम भगत (शेवगाव), नारायण झेंडे (श्रीगोंदा), सुनिता सोनवणे (श्रीगोंदा), नासिर सय्यद (श्रीरामपूर), सचिन रणाते (संगमनेर), बन्सी ठोंबरे (नगर), सुनंदा भडांगे (मुख्यालय) व वनमाला दिनकर (नगर), मारुती साळवे (श्रीगोंदा) या गुणवंत कर्मचार्‍यांना दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या