सार्वमत
नवी दिल्ली – केंद्र सरकार प्रवासी रेल्वेनंतर आता देशांतर्गत विमानसेवा लवकरच सुरू करण्याचा विचारात आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यासंदर्भात संकेत दिले होते. आता त्यांनी नुकताच दिल्ली विमानतळाचा दौरा केला आहे.
- Advertisement -
विमान प्रवासासाठी काही अटींचे पालन करणे गरजेचे असणार आहे. सामाजिक अंतर ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या तयारींचा अहवाल मिळाल्यानंतर सरकार विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.