Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळे : डॉक्टरसह एक जण करोनामुक्त

धुळे : डॉक्टरसह एक जण करोनामुक्त

आतापर्यंत 24 जणांना मिळाला डिस्चार्ज

धुळे  – कोरोना विषाणूवर (COVID 19) मात करीत डॉक्टर आणि नाशिक येथे उपचार घेणारा रुग्ण आपल्या घरी परतला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील 24 रुग्ण आतापर्यंत कोरोना विषाणू पासून मुक्त झाले आहेत. या डॉक्टरांना आज दुपारी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 66 रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू होते. त्यापैकी एका रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यापाठोपाठ श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील 24 रुग्ण कोरोना विषाणू पासून मुक्त झाले आहेत.

यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.

असे असले तरी नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. यादव, पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या