Friday, April 26, 2024
Homeनगरकृषी विभागाच्या परमिटला कृषी सेवा चालकांकडून केराची टोपली

कृषी विभागाच्या परमिटला कृषी सेवा चालकांकडून केराची टोपली

कोपरगाव (प्रतिनिधी)- खरिपाची पिके अवकाळी पावसाने भुईसपाट झाली. त्यात अडचणीतून कसेबसे सावरून पुन्हा रब्बीसाठी कंबर कसणार्‍या शेतकर्‍यांना कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन तथा महाबीज अकोला मार्फत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम 2019 अंतर्गत गहू आणि हरभरा बियाणाचे तालुका कृषी विभागाने परमीटचे वाटप केले. त्यानुसार शेतकर्‍यांना माफक दरात बियाणे खरेदी करता येणार होते. मात्र कृषी सेवा केंद्रांच्या आडमुठेपणामुळे कोपरगाव तालुक्यात या परमीटला सध्यातरी केराची टोपली दाखवावी लागल्याची खदखद शेतकर्‍यांत बघायला मिळत आहे.

तालुका कृषी कार्यालयामार्फत वाटप करण्यात आलेल्या परमिटमध्ये कुठल्या बियाणांसाठी सबसिडी देण्यात येणार आहे. असा उल्लेख नव्हता. केवळ चाळीस किलो गव्हाचे बियाणे 1040 रुपये किमतीत लाभार्थींना वाटप करायचे होते. त्यामुळे शेतकरी मागेल त्या वाणाला कृषी चालकांनी सबसिडी दिली नाही. ते पूर्ण रक्कम देऊनच बियाणे खरेदी करावे लागले. एकमेव लोकवन बियाणे परमीटवर नेण्याची सक्ती कृषी केंद्रांकडून लादली जात होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी शे पाचशे रुपयांच्या कटकटीपेक्षा रोख रक्कम देऊन बियाणे खरेदी करून पेरण्या उरकून घेतल्या. याबाबत कृषी विभागानेही कुठलीही कारवाई करून शेतकर्‍यांना न्याय दिलेला नाही. त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या परमीटला केराची टोपली बघायला मिळाली आहे. परमीट आणि बिले कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतरच एकूण वाटलेल्या परमीटमधून किती लाभार्थी वंचित राहिले. किती परमीटची रद्दी झाली तो आकडा लवकरच समोर येईल.

- Advertisement -

तालुका कृषी विभागाने दिलेल्या परमीटवर वाणाचे नाव नसल्यामुळे शेतकर्‍यांनी ज्या वाणाची मागणी केली त्यावर सवलत मिळाली नाही. कृषी विभागाने सुचविलेले महाबीजचे वाणही परमीट देण्यापुर्वीच रोखीने विकून दुकानदार मोकळे झाले. कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी तक्रारी करूनही या गैरप्रकाराकडे कानाडोळा करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या