Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामहात्मा गांधी पुण्यतिथी विशेष : खादीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासन पुढाकार घेण्याची...

महात्मा गांधी पुण्यतिथी विशेष : खादीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासन पुढाकार घेण्याची गरज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महात्मा गांधी (Mahatma Gandhi )यांनी आयुष्यभर खादी (Khadi) ग्रामोद्योगाचा ध्यास घेतला. स्वदेशीची कास धरली होती. लोकांनी खादी उत्पादने खरेदी केली तर अनेकांच्या हाताला काम मिळेल. ते स्वयंंपूर्ण होतील. असा त्यांचा कयास होता. खादीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी खादी खरेदीचा आग्रह धरला. मात्र खादीच्या वाढत्या किमती खादी खरेदीसाठी सरकार पातळीवरुन दिल्या जाणार्‍या प्रोत्साहनाला लागलेली कात्री यावर रामबाण उपाय जोपयर्ंंत शोधला जात नाही, तोपर्यंंत खादीला सुगीचे दिवस येणार नाही, अशी स्थिती आहे.

- Advertisement -

महात्मा गांधी यांची आज (ता.30)पुण्यातिथी Today is the 30th death anniversary of Mahatma Gandhi . त्या निमित्ताने बापूजींच्या खादी ग्रामोद्योगाचा आढावा घेतला असता वरील चित्र समोर येत आहे. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव तांबे म्हणाले की, सध्या मूळ खादीला डुप्लीकेट खादीने झाकून टाकले आहे. खादीच्या नावानेच भलतेच कापड बाजारात धुमाकूळ घालत आहे. मूळ खादी 200रुपये वार असल्याने ती सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे जे खरे गांधीवादी आहेत. देशाभिमान ज्यांच्या नसानसात भिनला आहे, ते खादीचे कपडे घेतल्याशिवाय राहत नाही. आज खादी टीकाव धरु शकण्यामागे ते मूळ कारण आहे.

सरकारी सेवकांनी राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी खादीचेच कपडे परिधान करावे, असे पंंतप्रधान नरेंंद्र मोदी यांंनी आवाहन केले होते. त्यानंतर प्रत्येक अधिकारी व सेवकाने ते वर्षातून एकदा जरी खरेदी केले असते तरी खादी उद्योगावर चार चांद लागले असते. मात्र दुर्देवाने तेथेही फार प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुनंदा जरांंडे म्हणाल्या की, पूर्वी खादीचे कपडे व इतर वस्तू खरेदीसाठी सरकारी पातळीवरुन उचल दिली जात होती. ती आता बंद झाली आहे.

किमान उचल देऊन खादी ग्रामोेद्योगातूनच वस्तू खरेदीचा पावती दाखवणे सक्तीचे केले तरी कोट्यवधी रुपयांंची खरेदी होऊन महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण होण्यास व खर्‍या अर्थाने आदरांंजली वाहिल्यासारखे होईल. त्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकीय पक्षांच्या मानसिकतेबद्दल भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सुनील केदार म्हणाले की, सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी वर्षातून एकदा जरी खादीचे कपडे खरेदी केले तरी या उद्योगाला चालना मिळेल. त्यासाठी प्रभावी जागृतीची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या