निवेदक : शुभम धांडे, नाशिक
दरवर्षी नवरात्रोत्सव सुरु झाला की, नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकेच्या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी उडायची. यंदा मंदिरे सुरु झाली मात्र भाविकांची गर्दी कमी होती. या नवरात्रोत्सव काळात कालिका मंदिराच्या रस्त्यावरून फेरफटका मारताना एक गोष्ट सातत्याने जाणवली ती म्हणजे यात्रा जरी नसली तरी काही लोक फुगे, खेळणी, चपला आणि इतर काही वस्तू विकत होती. विशेष म्हणजे भाविक या वस्तू विकत घेण्यासाठी गर्दी करत होते. यावेळी मनात विचार आला की, त्या छोट्या विक्रेत्यांकडे पाहून विचार आला की, लोकांना आता मरणाची पण भीती वाटत परंतु याच वेळी मनात दुसरा विचार आला की, जेव्हा प्रश्न जीवन जगण्याच्या भुकेचा असतो तेव्हा मरणाची भीती विसरायलाच होते नाही का? परिस्थितीने मजबूर लोकांकडे पाहून देवीकृपेने आतातरी करोनाचे हे संकट दूर व्हाव, आणि या छोट्या व्यापाऱ्यांना जगण्याची एक नवी उमेद मिळावी… एका या विशेष पॉडकास्टमध्ये…