Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापुन्हा हिरमोड! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित

पुन्हा हिरमोड! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित

मुंबई | Mumbai

शिंदे सरकारकडून जिल्हा परिषदांमध्ये (Zilla Parishad) किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना (Zilla Parishad and Panchayat Samiti Elections) स्थगिती देण्यात आली आहे…

- Advertisement -

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आली आहे, असा अध्यादेश आज प्रसिद्ध झाला आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्‍य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.

सध्या 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना उद्या प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर 13 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी, तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती, आता ही सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

निवडणूक स्थगित झालेल्या जिल्हा परिषदा

नाशिक, जळगाव, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

- Advertisment -

ताज्या बातम्या