Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचारित्र्य संशयातून केला पत्नीचा खून; वासळी येथील घटना

चारित्र्य संशयातून केला पत्नीचा खून; वासळी येथील घटना

नाशिक | प्रतिनिधी

सातपूर परिसरातील वासाळी शिवारात सोमवारी (दि १२) रात्री पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यानेच पतीने मद्याच्या नशेत पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.

- Advertisement -

वैशाली बाळू खेटरे (वय २८) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी तीचा पती बाळू खेटरे यास सातपूर पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि १३) सकाळी उघडकीस आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली बाळू खेटरे (वय २८)ही आपल्या पती बाळू खेटरे याच्या सोबत वासाळी मारुतीमंदीर परिसरात भाड्याने राहत होती. सोमवारी (दि १२). रात्री पती मद्य सेवन करून आलेल्या बाळू खेटरे याने चारित्र्यावर संशय घेत पत्नीस दुपारी कुठे गेली होतीस याचा जाब विचारला, पत्नीने हरतर्‍हेने सांगूनही त्याच्या त्यावर विश्‍वास न बसल्याने पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

या वादात पती बाळू खेटरे याने पत्नी वैशाली हिला मारहाण केली. सकाळी वैशाली हिला उठवण्याचा प्रयत्न केला . तेव्हा ती मयत अवस्थेत सापडल्याने गावांत खळबळ निर्माण झाली. गावातील पोलीस पाटील यांनी सदर प्रकार सातपूर पोलिसांना कळविण्यात आले.

या बाबत पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.यावेळी गळा दाबून महिलेस मारण्यात आल्याचा अहवाल आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले.

सदर प्रकरणात संशयित बाळू खेटरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक उपपोलीस निरीक्षक रगुनाथ नरवटे पुढील तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या