राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

jalgaon-digital
1 Min Read

पुणे । प्रतिनिधी Pune

येत्या 5 दिवसांत राज्यातील ( Maharashtra State ) मराठवाड्यासह, विदर्भ, लगतचा उत्तर महाराष्ट्र परिसरात उष्णतेच्या लाटेचा ( Heat Wave ) इशारा हवामान खात्याने (Metrological Department )दिला आहे.दरम्यान, मंगळवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 43.4 अंश तर अकोल्यात 43.1 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

हवामान खात्याकडून 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना तर 31 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला.

मंगळवारी विदर्भातील अकोल्यात 43.1,वर्धा 42.4, अमरावती 41.9,ब्रम्हपुरी 41.7, यवतमाळ 41.5, वाशिम 41.5, बुलडाणा 40.2,गडचिरोली 39.6 आणि नागपूर येथे 41.5 अंश तापमानाची नोंद झाली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *