नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आज पहाटे नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ जण जखमी झाले आहेत.
- Advertisement -
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतर वणी येथील सप्तशृंगी गडावर एका बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.
सप्तसृंगी गडावर बसला लागलेल्या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ३३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
नाशकात मृत्यूचं तांडव! अपघातानंतर बसने घेतला पेट, दुर्घटनेचा भयावह व्हिडीओ आला समोर