नवी दिल्ली। New Delhi
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री फिरणावरील निर्बंध उठवण्यात आले आहे. तसेच ५ ऑगस्टपासून जीम देखील सुरु हाेणार आहे. परंतु मेट्राे, रेल्वे व चित्रपटगृह बंदच राहणार आहे. शाळा, महाविद्यालये व काेचिंग ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहे.
- Advertisement -
करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे.