कंपनीला भीषण आग; दोन कामगार जखमी

मुंबई  | Mumbai

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका बड्या कंपनीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज बदलापूर (Badlapur) MIDC मध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास बदलापूर MIDC मधील एका कंपनीला आग (Fire) लागली. या आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, परिसरात सर्वत्र धुराचे लोट बघायला मिळत होते. यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे (fire brigade) बंब घटनास्थळी रवाना झाले. यानंतर त्यांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच या आगीत दोन कामगार जखमी झाले असून इतर कामगारांना (workers) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. तर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.मात्र, अशापद्धतीने कंपन्यांमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना ह्या वातावरणातील प्रदूषण, मानवी सुरक्षा (Pollution, human safety) यादृष्टीने चिंतेची बाब असल्याचे बोलेल जात आहे..