Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

पालघर | Palghar

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) भरधाव कंटेनरने एका दुचाकीला (Bike) जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील चारोटी (Charoti)जवळील एशियन पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात (Accident)झाला असून भरधाव कंटेनरने ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वारांना चिरडले. त्यावेळी अपघातात ३ दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिवसेना कोणाची? आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी… एकाच क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट….

तसेच हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कंटेनरने (Overflow Container) दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीसह तिघांना १०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर फरफटत नेले. तसेच हे तिन्ही दुचाकीस्वार तलासरी (Talasari) येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

“माणसाने किती खोटं बोलावं, देवेंद्र फडणवीस जगातील दहावे…” संजय राऊतांचे टीकास्त्र

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत तिन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात (Government Hospital) हलवले. तर कंटेनर चालकाचा शोध घेतला जात आहे.

धक्कादायक! पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव कारने महिलांना चिरडलं, ५ जणींचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या