रायगड | Raigad
जिल्ह्यातील पेण तालुक्यातील (Pen Taluka) सावरसई परिसरात (Savarsai Area) कार आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) घडल्याने तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब बाळूमामाच्या यात्रेसाठी (Balumama Yatra) कोल्हापूरला (Kolhapur) जात होते. मात्र पेण तालुक्यातील सावरसई परिसरात ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार समोरून येणाऱ्या एका ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. तसेच हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.