जळगाव : jalgaon
कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये (Karjat-Jamkhed Constituency) युती सरकारच्या (coalition government)कळात मंजुर (approved) झालेले राज्य राखीव पोलिस बल गट प्रशिक्षण केंद्र (State Reserve Police Force Group Training Centre) त्याच काळात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात हलविण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Govt) सरकार आल्यानंतर आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी हे केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यातील (Jamkhed Kusdgaon) कुसडगाव येथे आणले. मधल्या काळात त्याचे कामही सुरू झाले. मात्र, आता सत्तांतर झाल्याने हा प्रकल्प पुन्हा जळगाव जिल्ह्यात हलविण्याच्या (Project again in Jalgaon District) हालचाली सुरू (Start moving) झाल्या आहेत.
भुसावळचे भाजपाचे आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) यांनी हे केंद्र वरणगावला आणावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानुसार फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना कामाच्या सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी आमदाराला कामाचे श्रेय जाऊ नये, म्हणून असा निर्णय होणार असेल तर भाजपचे हे विकास विरोधी राजकारण आहे, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी सीआरपीएफ सेंटरसाठी पाठपुरावा करावा- सावकारे
मुळात कर्जत येथे सीआरपीएफचे सेंटर मंजूर होते. राज्यपालांनी मंजूरी देऊन शासन निर्णय झाल्यानंतरही वरणगावचे केंद्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन त्यांनी ते पळविले होते. आमचा विकासाला विरोध नाही. त्यांनी त्यांच्याकडे मंजूर असलेल्या सीआरपीएफ केंद्रासाठी पाठपुरावा करावा असा टोला भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी लगावला आहे.