Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यावणवे थांबले तरच जमिनीची सुपीकता टिकेल

वणवे थांबले तरच जमिनीची सुपीकता टिकेल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतातील मातीबरोबरच ( Farm Soil ) जैवविविधता टिकवायची असेल तर अवतीभोवतीचे डोंगर ( Mountain )व जंगलेही ( Forest ) वाचवले पाहिजे.वणव्यांपासून जंंगलाचे रक्षण केलेे पाहिजे.तरच जमिनीची सुपीकता टिकवता येऊ शकते. त्यासाठी वनखात्याबरोबरच पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही तेवढेच संवेदनशीलपणे यात सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा वन्यजीव अधिकारी अशोक काळे (Wildlife Officer Ashok Kale) व नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या क्षेत्रीय अधिकारी पूजा कोठुळे (Pooja Kothule, Regional Officer, Nature Conservation Society)यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

‘देशदूत’च्या विशेेष संवाद कट्ट्यात काळे व कोठुळे यांच्याशी ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी माती वाचवा-बोरगड येथील मानवनिर्मित जंगल या विषयावर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

काळे म्हणाले, येथे जंगल, नद्या, डोंगर यांंची विपुल संपत्ती लाभली आहे. मात्र गेल्या 20 वर्षांत शेतीचे स्वरूप बदलले आहे. पाऊस अनियमित पडत आहे. मानवी वस्ती जंगलात अतिक्रमण करत आहे. त्यामुळे जंगल कमी होत आहे. डोेंगरावर केवळ झाडे-झुडपे दिसत आहेत. खडक उघडे पडून पावसाळ्यात चांगली काळी मातीही वाहून जात आहे. त्यामुळे जंगलाचा होणारा र्‍हास थांंबवणेे गरजेचे आहे.

त्यानंंतर बोरगड येथील डाेंंगरावर लागलेल्या आगी व त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर लावलेल्या झाडाझुडपांबद्दल कोठुळे म्हणाल्या की, बोरगडला पूर्वी सागाची भरपूर झाडे होती. नंतर तोड होऊ लागली. काहीवेळा वणवे लागले. त्यामुळे डोंगर ओसाड पडू लागला होता. 2007 मध्ये महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने येथे दीड लाख झाडे लावली. बोरगड परिसरातील नागरिकांनी खूप चांगले सहकार्य केले. लष्कराच्या तळामुळे येथील जंगलाचे बर्‍यापैकी रक्षण झाले.त्यामुळे आता सर्वाधिक झाडे येथे दिसत आहेत. बोरगड डोंगराला गतवैभव प्राप्त करून देण्यात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबून सुपीक जमीन टिकून राहिली आहे.

डोंगराला लागणारे वणवे, त्यानंतर वन्यजीवांचे शहरात होणारे आगमन व त्यामुळे नागरिकांत निर्माण होणार्‍या भीतीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, वणवे हे एक प्रकारची आपत्तीच आहे. बहुतांशी वेळा वणवे हे मानवनिर्मितच असतात. मात्र आग लावणारे शोधणे अवघड असते. वणवा लागल्यानंतर यंत्रणा येईपर्यंंत स्थानिक नागरिकांनी ती आग विझवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते.शेतकर्‍यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी 1926 हा हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे. वणवा लागल्यानंतर तो विझवला गेला तरी त्यामुळे झालेलेे नुकसान कदापि भरून निघत नाही. यात झाडे तर जळतातच मात्र मातीचीसुद्धा हानी होते. आगीच्या घटनेनंतर वनखात्याने काही ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीसुद्धा स्थानिक नागरिकांंनी याबाबत दक्ष राहणेे गरजेचे आहे.

वन्यजीवांचे शहरात होणारे आगमन, त्यामुळे होणारी जीवितहानी याबाबत ते म्हणाले की, वन्यजीव कधीही नरभक्षक नसतो. वनात जेव्हा त्याला पाणी व भक्ष मिळत नाही तेव्हाच तो भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत येतो. त्यावेळी नागरिकांनी गर्दी न करता वनखात्याला त्यांंंचे काम करू दिले पाहिजे. मात्र उत्सुकतेपोटी सर्वच तेथे गर्दी करतात. दुर्घटना घडतात. त्यासाठी वन व वन्यजीव कायदा माहिती होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या