मुंबई | Mumbai
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) सुपर १२ फेरीतला अखेरचा सामना आज मेलबर्नमध्ये (Melbourne) पार पडला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा (Zimbabwe) पराभव करुन ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे…
सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुलच्या (Suryakumar Yadav and Lokesh Rahul) अर्धशतकांच्या जोरावर भारताने (Team India) झिम्बाब्वेला १८७ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव ११५ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना ७१ धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने थेट सेमीफायनमध्ये (Semifinals) प्रवेश केला आहे.
दरम्यान, आज सकाळी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला हरवून पॉईंट टेबलमध्ये दुसरे स्थान गाठले आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या सेमी फायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये ९ नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये (New Zealand and Pakistan) पहिली सेमीफायनल होणार असून १० नोव्हेंबरला भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यात दुसरी सेमीफायनल होणार आहे.