चांगली बातमी : सणांमुळे ८० विशेष रेल्वे सुरु होणार

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

करोनामुळे देशातील रेल्वेसेवा (Indian Railways) बंद आहे. मात्र, काही विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत.

सप्टेंबरमध्येच रेल्वेने ८० विशेष आणि ४० क्लोन गाड्या चालवण्यात आल्या. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळी, दसरा हे सण येत आहे. या सणांमुळे रेल्वे मंत्रालयाकडून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. आणखी ८० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालय विशेष गाड्या वाढवू शकते. भारतीय रेल्वे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठीही विशेष गाड्या चालविण्यात आल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *