Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांच्या समस्या सोडवा

शेतकर्‍यांच्या समस्या सोडवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांबाबत खा.डॉ.भारती पवार यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देत या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे.कृषीमंत्री भुसे यांनी नाशिक जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली.त्यावेळी खा.डॉ.भारती पवार यांनी निवेदन देत यावर तातडीने आपल्या स्तरावर योग्य निर्णय घेऊन वंचित शेतकर्‍यांना दिलासा द्यावा,अशी मागणी केली.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की,सध्या सर्वत्र पेरणी हंगाम सुरू आहे तर काही ठिकाणी पेरणी पुर्ण झालेली आहे. अनेक शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध झाले नसुन ते मिळविण्याकरीता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना संथ गतिने कर्ज वाटप चालु आहे. यासंदर्भातही योग्य ती पावले उचलुन शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज मिळण्यासाठी संबंधीत बँकांना आदेश करावे. पेरणीसाठी दिले गेलेले बियाने निकृष्ट दर्जाचे असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या असुन अनेकांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झाले आहे. अशा शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी व त्यांना चांगल्या प्रतीच्या बियाणांचे वाटप करण्यात यावे.

शेती पिकासाठी लागणारा युरिया व रासायनिक खते शेतकर्‍यांना मिळत नसुन ते मिळविण्यासाठी त्यांना इतर मार्गाने जास्त किंमत मोजावी लागत आहे. त्याचप्रमाणे सरकारी नियमानुसार खते खाजगी गोदामात न ठेवता सरकारी गोदामातच ठेवण्यात यावे. तसेच केंद्रीय मुलभुत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण झाले असुन शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा मका शिल्लक आहे. यावर राज्य शासनाने केंद्राकडे वाढीव मका खरेदी करण्यासाठी मागणी करावी.

केंद्र सरकारचा अद्यादेश असताना शेतकरी कृशीमाल कोणत्याही शहरात कोणत्याही बाजार पेठेत विकु शकतो तरी देखील नाशिक शहरात शेतकर्‍यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व बाहेर पोलीस यंत्रणा कृषी माल विकण्यात मज्जाव करताना अट्टल गुन्हेगारांपेक्षाही वाईट वागणुक देत आहेत. बाजार समिती सर्व शेतमाल आपल्या आवारात विकण्यास परवानगी देत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अषा नानाविध समस्यांना शेतकर्‍याला तोंड द्यावे लागत असुन यावर त्वरीत उपाययोजना करून शेतकर्‍यांना दिलासा मिळवुन द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या