Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाचांगली बातमी : ...तर मीराबाईचे रौप्य पदक सुवर्णपदकात बदलेल

चांगली बातमी : …तर मीराबाईचे रौप्य पदक सुवर्णपदकात बदलेल

मीराबाई चानूने (Chanu Saikhom Mirabai) टोकियो ऑलिम्पिक (Olympics) 2020 मध्ये भारतासाठी (India) पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटातील महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशासाठी पहिल्यापदकाची कमाई केली आहे. तिला रौप्य पदक मिळाले आहे. आता तिचे हे रौप्य पदक सुर्वणपदाकात बदलू शकते.

वेटलिफ्टिंग च्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात शनिवारी मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या हाओ झी हिची अँटी डोपिंग अधिकाऱ्याकडून चाचणी करण्यात आली आहे आणि त्यात ती दोषी आढळल्यास तिच्याकडून सुवर्णपदक काढून घेतले जाईल.

- Advertisement -

चानूपूर्वी सिडनी ऑलिम्पिक २००० कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनात भारताला कांस्यपदक दिले. कर्णम मल्लेश्वरीने त्यावेळी एकूण २४० किलो वजन उचलले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या