राज्यात दंगली घडविण्याचा कट; भाजप निराशा व वैफल्याने ग्रासलाय - खासदार संजय राऊतांचे अनेक टोले

महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना झेड प्लस सुरक्षाही मिळेल
संजय राऊत
संजय राऊत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात दंगली घडविण्याचा कट रचला जात आहे. भाजप निराशा आणि वैफल्याने ग्रासला गेला आहे. भोंगे लाऊन हिंदुत्व वाढत नाही. त्यांचे भोंगे कोल्हापूरकरांनी खाली उतरवले आहेत. भोंग्यांवरून घाणेरडं राजकारण राज्यात सुरु असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली....

खा. राऊत आज नाशकात आयोजित पत्रकार परिषदेत संबोधित करत होते. ते म्हणाले, राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात दंगली घडविण्याचा कट रचला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे.

ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यांत तणाव निर्माण केला जात आहे. तणाव निर्माण करून निवडणुका लढविण्याचा आणि जिंकण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

भोंग्याचा राजकारण आजच संपले आहे. राज्यात भोंग्यांचे राजकारण करणाऱ्यांना राष्ट्रगीतदेखील म्हणता येत नाही. राज्यात अस्थिरता आणणार्यांनी हनुमान चालीसा पाठ म्हणून दाखवा असे आव्हान खा. संजय राऊतांनी दिले आहे.

भाजप हा पक्ष निराशा आणि वैफल्याने ग्रासला गेला आहे. राज्यात प्रयत्न करूनही अनेक लोकं अशांत होत नाहीयेत. तीन पक्षांचे मनोमिलन घट्ट आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा कुटील डाव विरोधकांचा आहे.

खासदार राणांना दिल्लीला वेळ मिळतो तेव्हढा पुरेसा आहे. महाविकास आघाडीविरोधात जे बोलतील त्यांना केंद्राकडून सुरक्षा दिली जाते हे नवीन नाही. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी करोडो रुपये हडप केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com