मुंबई
सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकासआघाडीत खलबतांना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सचिन वाझे प्रकरणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस तसंच राज्य सरकारची बदनामी होते आहे. वाझे प्रकरण हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचे चित्र आहे. त्यावरही पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय.
गृहमंत्री बदलणार नाही
महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेबदल होण्याची कोणतीही शक्यता नाही, काही जणांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवण्याचं काम सुरु असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली असल्याचंही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.