उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

जीवाला जीव देणारे शिवसैनिक लाभले म्हणून शिवसेना उभी राहिली - उद्धव ठाकरे

मुंबई । Mumbai

५६ वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन झाली त्यावेळीचा दिवस आजही आठवतो. एक वन बीएचके खोलीत बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्यावेळी आम्ही लहान भावंड होतो. त्यावेळी माझे वय फक्त ६ वर्ष होते. माझ्यासमोर शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडले होते. त्यावेळी नारळाच्या (Coconut) पाण्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले होते, आज स्वप्नातही वाटले नव्हते ते शिंतोंडे मला भिजवून टाकतील. वय लहान होते, उत्साह होता. पण, जबाबदारी किती मोठी आहे, हे आज कळले. जीवाला जीव देणारे शिवसैनिक लाभले त्यामुळे शिवसेना उभी राहिली. या ५६ वर्षांत अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडवले, घाम गाळला, त्यांनी जे काम केले त्यामुळे आज आपण शिवसेना पाहत आहोत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे...

आज शिवसेनेचा (shivsena) ५६ वा वर्धापन दिनाचा (foundation day) कार्यक्रम मुंबईतील पवई (Powai) येथील वेस्टीन हॉटेलच्या (westin hotel) सभागृहात पार पडला. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित आमदार (mla) व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण फाटाफुटीचे राजकारण (Politics) भोगत आलो आहोत. पण कितीही फाटले, तरी शिवसेना अजून मजबुतीने उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवले आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, अशी आठवण देखील उद्धव ठाकरेंनी सांगितली.

पुढे ते म्हणाले की, मी जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना. त्या क्षणाचे साक्षीदार माझे वय सहा वर्ष. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर. फार मोठी जबाबदारी किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काहि आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावतॆ पहिल्या पिढीचे. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली हेच खूप होत. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी. दोघांनीही रूसवे फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक (marmik) छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी (Diwakar Raote) ते शक्य केले.

तसेच सुभाष देसाईंचे (Subhash Desai) नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक. एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. इतके आमदार दिसायला हवे. रमेश गेला कट्टर कार्यकर्ता. अस म्हटले जात पायलट त्याचे ट्रेनिंग तसा एखादा कार्यकर्ता गेला तर तो मोठा फटका असतो. असेही ठाकरेंनी सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपले एकही मत फुटलेले नाही. मग फुटले कोणते? तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आता शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com