Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर का वाढवली सुरक्षा ?

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर का वाढवली सुरक्षा ?

नवी दिल्ली

सुशांत प्रकरणावरुन चित्रपट सुष्टीत वाद-विवाद सुरु झाले आहे. त्या वादाचे परिणाम आता बच्चन परिवारावर पडले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सर्व चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्यसभेत अभिनेत्री जया बच्चन यांनी सुशांत प्रकरणात बोलताना सांगितले होते की, ‘जिस थाली मे खाते है, उसी मे छेद करते है’ त्यानंतर कंगनाने जया बच्चनवर टीका केली होती. जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या सर्व चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.सर्व बंगल्यावर असणाऱ्या सिक्योरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी बच्चन परिवाराला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या