Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात 'ग्रामीण महाआवास अभियान'

राज्यात ‘ग्रामीण महाआवास अभियान’

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

- Advertisement -

ग्रामीण भागातील नागरीकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात आजपासून ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत “महाआवास अभियान-ग्रामीण” राबविले जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महा आवास अभियान-ग्रामीणअभियानामध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण १६ लाख २५ हजार ६१५ इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ लाख २१ हजार ७२९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. येत्या १०० दिवसांच्या अभियान कालावधीत उर्वरित ५ लाख ३ हजार ८८६ घरकुलांना मंजूरी देण्याचा मानस आहे. तसेच या लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये याप्रमाणे ७५० कोटी रुपये वितरीत करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणार

घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे ७३ हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजारपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या