Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकिमान गुणांची अट शिथिल

किमान गुणांची अट शिथिल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

इंजिनियरिंग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट 5 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान 1 गुण आणि बारावीला किमान 45 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे. यापूर्वी बारावीच्या गुणांची अट ही 50 टक्के इतकी होती. मागासवर्गासाठी किमान गुणांची अट ही 40 टक्के इतकी असणार आहे.

अभियांत्रिकी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे याबाबतचे राजपत्र राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे. यामध्ये इंजिनियरिंग पदवी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान 45 टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे.

यापूर्वी ही अट अनुक्रमे 50 व 45 टक्के इतकी होती. नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे. कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती.

इंजिनियरिंग सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही 50 व 45 टक्क्यांवरून अनुक्रमे 45 व 40 टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी आपल्या राज्यात प्रवेश घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या