Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. या भरती प्रक्रियेला उद्या, शनिवार पासून सुरुवात होत असून उमेदवारांना ११ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

- Advertisement -

लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज याबाबत धोरणात्मक निर्णय घेत पशुसंवर्धन विभागाची बहुप्रतिक्षित पदभरती आज जाहीर केली .

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यात पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४, लघुलेखक उच्चश्रेणीची ०२, लघुलेखक निम्नश्रेणीची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ४, तारतंत्रीची ३, यांत्रिकी आणि बाष्पक परिचरची प्रत्येकी २ अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत.

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.. २७ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ जून ३०२३ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. या भरतीसाठीची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या