पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू

पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. आंजर्ले बीच हा धोकादायक समजला जातो.

लॉकडाऊनच्या नियम-अटी शिथील झाल्यानंतर पर्यटक आता समुद्रकिनारी फिरण्यासाठी जात आहेत. पुण्यातील सहा जण फिरण्यासाठी रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्रकिनारी आले. यावेळी हे सहा जण पाण्यात उतरले. पोहण्याचा आनंद घेत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने सहापैकी तीन जण बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर स्थानिकांनी तीन जणांना वाचण्यात यश आले आहे.

सर्व पर्यटक पुण्यातील

सर्व पर्यटक पुण्यातील औंधमधून आले होते. निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पालांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी त्यांची नावे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com