तेलंगणा | Telangana
तेलंगणामध्ये एका भयानक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणीचं तिच्या घरातून अपहरण करण्यात आलं आहे.
एका वेळी १०० पेक्षा जास्त लोक घरात घुसले आणि आमच्या मुलीला घेऊन गेले, असा आरोप संबंधित महिलेच्या आईवडिलांनी केला आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचं वय २४ वर्ष असून तिचं नाव वैशाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या तरुणीच्या घरात १०० पेक्षा जास्त लोकांनी घुसून घरातील सामानाची नासधूस केली. गाडीचीही तोडफोड केली. इतकंच नाही, तर या गुंडांना विरोध करणाऱ्या तरुणीच्या वडिलांनाही लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत.