राज्यात आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस (vaccine)देण्यात आला आहे. दोन डोस 62 टक्के लोकांना लस दिले आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण केले आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले. स्कुल कॉलेज (school)बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं
Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?
राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल.
काँग्रेसने तिकिट दिलेली ‘बिकनी गर्ल’ अर्चना गौतम कोण आहे?