नाशिक
मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आज नाशिकमधील वातावरण बदलले. दुपारी ३.३० वाजता वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार झाले. विजांचा कडकडाट सुरु झाला. दुपारी ४.१५ वाजता पावसाला सुरुवात झाली.
पुढील तीन-चार दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष व कांदा पिकास फटका बसणार आहे.
आज दुपारी अचानक आभाळ भरून येऊन पावसाच्या रिमझिम सरी सुरू झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. शहरातील काही भागांत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसल्याने गेल्या काही दिवसांपासून झालेल्या उकाड्यापासून नाशिककरांना दिलासा मिळाला.