Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे टोल प्लाझा रद्दचा प्रस्ताव केंद्राकडे

शिंदे टोल प्लाझा रद्दचा प्रस्ताव केंद्राकडे

दे. कॅम्प । वार्ताहर

नाशिक- सिन्नर महामार्गावरील ( Nashik- Sinnar Highway ) शिंदे टोल प्लाझा (Shinde Toll Plaza ) सिन्नरपासून अवघ्या सहा तर नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीपासून अवघा पाच किलोमीटर अंतरावर आहे. नोकरी, शिक्षण आणि हॉस्पिटलायझेशनच्या कामांसाठी सिन्नर येथील शेकडो वाहने दररोज या टोल प्लाझावरून ये – जा करत असतात.

- Advertisement -

इतक्या कमी अंतरासाठी टोल द्यावा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. येथे वाहनधारकांना सोयी सुविधा मिळत नाही, याबाबत राज्य व केंद्राकडे केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली असून हा टोल प्लाझा रद्द करावा Shinde Toll plaza should be canceledअथवा संगमनेर टोल प्लाझात याचे विलनीकरण करावे, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्रकडे केली असल्याची माहिती खा हेमंत गोडसे 9 MP Hemant Godse )यांनी दिली.

शिंदे टोल प्लाझाच्या वीस किलोमीटर परिघातील वाहनधारकांना 250 रुपयांचा पास सक्तीचा असून या परिघातील शिंदे औद्योगिक वसाहत, ब्राम्हणवाडे, मोहगाव, पळसे, चिचोले, वडगाव आदी गावांमधील लोकसंख्या सुमारे 15 लाखांच्या घरात आहे . सिन्नर शहरातील शेकडो वाहन धारकांना रोज नोकरी, हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी नाशिक शहरात ये-जा करावी लागते. त्यामुळे वीस ते पंचवीस किमी अंतरासाठी रोजच टोल भरावा लागत असल्याने स्थानिक वाहनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

याबरोबर नाशिक येथून सिन्नरच्या दिशेने जाण्यासाठी शिंदे टोल पासून पुढे अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर संगमनेर शिवारात पुन्हा दुसरा टोल आहे. यामुळे नाशिककरांना पन्नास किलोमीटर अंतरावर दोनदा टोल भरावा लागत असल्याने नाशिक शहरातील वाहन धारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या विषयीची तक्रार खा. गोडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

शिंदे टोल प्रकल्पाची किंमत 312 कोटी असून पैकी 192 कोटीच कंत्राटदाराचा खर्च होता, त्यामुळे संगमनेर जवळील हिवरगाव शिवारातील टोल प्लाझामध्ये शिंदे टोल प्लाझाचे विलनीकरण केल्यास केल्यास आर्थिक नुकसान होणार नसून नाशिक, सिन्नर मधील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे . शिंदे टोल प्रशासनाच्या मनमानी कारभाराविषयीच्या तकारी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे खा . गोडसे यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते .

याविषयीचा सविस्तर अहवाल नॅशनल हायवेच्या जिल्हा स्तरावरूनही राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता . आ .माणिकराव कोकाटे , माजी आमंदार राजाभाऊ वाजे यांनीही टोल प्रशासन विषयीच्या नागरीकांच्या व्यथा राज्यशासनाकडे मांडत दिलासा देण्याची मागणी केली होती . शिंदे टोल प्लाझामुळे नाशिक , सिन्नर आणि परिसरातील गावक – यांची होणारी कुचंबना लक्षात घेत सदर टोल नाका रद्द करावा वा संगमनेर शिवारातील टोल प्लाझात शिंदे टोल नाक्याचा समावेश करावा याविषयीची शिफारस नुकतीच राज्य शासनाने केंद्रशासनाकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या