नाशिकमध्ये मृत्यू तांडव! पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक | प्रतिनिधी | Naashik

आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे...

यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. याबाबत पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक येथील बस दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी हळहळ व्यक्त केली आहे. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com