नाशिक | प्रतिनिधी
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकरी मारायला आलेत असे वादग्रस्त वक्तव्य केले. याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून केंद्रीय मंत्री कटारिया यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे...
यादरम्यान, प्रहार संघटनेचे अनिल भडांगे म्हणाले की, खर तर शेतकरी दिल्ली दरबारी आपल्या न्याय मागायला गेले आहेत. एवढे दिवस शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहे तरीदेखील अद्याप सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही.
उलट केंद्र सरकारचे मंत्री वाटेल ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे प्रहार संघटनेकडून कटारिया यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
कटारिया यांना हे वक्तव्य महागात पडणार असल्याचा इशाराही प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.