Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या‘मिशन भगीरथ’साठी नियोजन करावे

‘मिशन भगीरथ’साठी नियोजन करावे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मिशन भगीरथ प्रयास या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम भविष्यात सातत्याने राबवण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे प्रतिपादन जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जलशक्ती अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, उपवनसंरक्षक उमेश वावरे, केंद्रीय जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी पंकज बक्षे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नाशिक विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा

केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पातळीवर करण्यात आलेली कामे समाधानकारक असून या कामांची शहरी भागात व्याप्ती वाढवण्यात यावी. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणारे मिशन भगीरथ प्रयास या उपक्रमातील पहिल्या वर्षातील झालेली कामे अतिशय उत्कृष्ट आहेत. या कामांचे सातत्य टिकवण्यासाठी मिशन भगीरथ प्रयास उपक्रम अजून पुढील काही वर्षे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी या उपक्रमाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून केंद्र शासनास सादर करावा, असेही केंद्रीय नोडल अधिकारी महिमापत रे यांनी यावेळी सांगितले.

नाशकात ‘स्ट्रीट फूड हब’; राज्यात केवळ तीन शहरांची निवड

केंद्रीय पथकामार्फत दोन दिवसीय दौर्‍यात जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, पेठ व येवला तालुक्यांत झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी पेठ तालुक्यातील आसारबारी येथील प्राथमिक शाळा तसेच अमृत सरोवर योजनेंतर्गत तयार केलेल्या पाझर तलावाची पाहणी केली. त्याचप्रमाणे कोपुर्ली येथे अमृत सरोवर योजनेंतर्गत केलेले नाला रुंदीकरणाचे काम, मौजे जोगमोडी, आमडोंगरा व आंबे या गावांत सुरू असलेल्या कामांनाही केंद्रीय पथकाने भेट दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या