<p><strong>मुंबई | प्रतिनिधी </strong></p><p>गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये संकलित करण्याचे टार्गेट दिले होते. असा खळबळजनक आरोप मुंबई पोलीस महानिरीक्षक पदावरून उचलबांगडी झालेल्या परमवीर सिंग यांनी केले आहेत...</p>.<p>आज मुख्यमंत्र्यांना त्यांनी एक पत्र पाठवले असून यात हे खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. स्वतःला वाचविण्यासाठी परमवीर सिंग यांनी हे पत्र पाठवले असावे असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.</p><p>राजकीय वर्तुळात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, परमवीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात मुंबईत १७५० बार आहेत. यांच्याकडून २-३ लाख रुपये जरी दरमहा जमा केले तरीदेखील ४०-५० कोटी सहज होतील असे सांगितले होते.</p><p>तसेच गृहमंत्री ज्ञानेश्वरीवर सचिन वाझे यांना बोलवत होते. तसेच त्यांना हे टार्गेट देण्यात आल्याचे पत्रात म्हटले असल्याचे समजते. </p>