वेळुंजे | Velunje
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या भात पिकावर मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
- Advertisement -
यामुळे यंदाच्या भात उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासाठी प्रशासनाने भात शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
याबाबत कृषि मंत्री दादा भूसे यांची भेट घेऊन भात शेतीच्या नुकसानाबाबत माहिती देण्यात आल्याचे समाधान बोडके यांनी सांगितले.