मुंबई
केंद्र सरकारने कांदा उत्पादनावर निर्यात बंदी घातल्यामुळे वाद पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
- Advertisement -
केंद्रसरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. हजारो टन कांदा आता बंदरांमध्ये अडकला आहे. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. आता महाविकास आघाडी सरकार या निर्णयावर फेरविचार करावा यासाठी केंद्राला पत्र लिहिणार आहे. दरम्यान केंद्राच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.