<p>नवी दिल्ली</p><p>भारतीय रेल्वे आपले नेटवर्क अपग्रेड करत आहे. यामुळे ताशी १३० ते १६० किमी वेगाने रेल्वे धावणार आहेत.</p>.<p>स्वर्णिम चतुर्भुज योजनेप्रमाणे लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्यामध्ये स्लीपर कोच पुर्णपणे संपवण्यात येणार आहे. म्हणजेच या गाड्यांमध्ये फक्त एसी कोच असणार आहेत. या गाड्यांचा वेग १३०/१६० किमी प्रति तास असेल. खरंतर मेल व एक्सप्रेस रेल्वे १३० किमी किंवा त्यापेक्षा वेगाने चालवण्यासाठी नॉन-एसी कोचमध्ये तांत्रीक अडचण निर्माण होते. यामुळे या गाड्यांमधून स्लीपर कोच संपवण्यात येणार आहे. या गाड्यांध्ये सध्या ८३ कोच लवण्याचा प्रस्ताव आहे. तो वर्षाअखेर पर्यंत १०० कोचवर जाणार आहे.</p><p>पुढील वर्षी २०० कोच</p><p> तसेच पुढील वर्षी कोचची संख्या २०० घेऊन जाण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हे बदल करता तिकिटांचे दर आताच्या एसी-३ पेक्षा कमी ठेवण्याचा विचार आहे. हे बदल करताना नॉन एसी कोच नसतील, असे नाही. परंतु या गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास असेल.</p>