Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी

मुंबई

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाच जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली.

नाताळ व नववर्षामुळे राज्यात कोरोनाच्या धोका वाढू शकतो. यामुळे राज्यात उद्यापासून (दि. २२ डिसेंबर) ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. ही संचारबंदी मनपा क्षेत्रात लागू असणार आहे. यापुर्वी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा महिने मास्क सक्तीचे राहणार असल्याचे सांगितले होते.

त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या