Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या.....म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नावडते झाले

…..म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नावडते झाले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

काही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray)अचानक नावडते झाले, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil)यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला लगावला.

- Advertisement -

गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर गेले दोन महिने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडले आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

शिंदे गटात जाण्याची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. कुणाला कशाची भीती आहे याची माहिती लोकांना आहे. तुम्ही जर गावखेड्यात गेलात तर लोक शिंदे गटाबाबत काय चर्चा करत आहेत याची कल्पना येईल, असे जयंत पाटील यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

शिवसैनिकांनी कधीच निष्ठा बदलली नाही. निष्ठा न बदलणारा म्हणजेच शिवसैनिक. आजघडीला सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. काही लोक फक्त इकडे-तिकडे झाले आहेत. मात्र खरा शिवसैनिक अजून तळ ठोकून आहे,असेही पाटील म्हणाले.

सोनिया गांधी यांच्या चौकशीत मानवतावादी दृष्टीकोन हवा

सध्या ईडी, सीबीआय, आयटीमार्फत चौकशी होणे हे नित्याचे झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय पाहता, प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, असेही मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या