Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागुन्हा नोंदवला म्हणूनच हे झाले; आमदार देवयानी फरांदे यांचा पोलीस प्रशासनावर आरोप

गुन्हा नोंदवला म्हणूनच हे झाले; आमदार देवयानी फरांदे यांचा पोलीस प्रशासनावर आरोप

नाशिक| प्रतिनिधी Nashik

नाशकात गुन्हा दाखल केला त्यामुळेच एवढा प्रकार घडल्याचे नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी सांगत पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहे….

- Advertisement -

वसंतस्मृती (Vasantsmruti) या भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी याप्रसंगी करण्यात आली.

गुन्ह्याची नोंद नाशिकमध्ये न करता जर कोकणात केली असती तर नाशिकमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती. तसेच सत्ताधारी शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. जे कुणी हल्ले करत आहेत त्यांना तातडीने अटक करा.

शिवसेनेचेच कार्यकर्ते कार्यालयावर हल्ला करत आहेत (Shivsena Supporters). ज्या तत्परतेने तुम्ही गुन्हा नोंदवला त्या तत्परतेने तुम्ही त्यांना अटक करत नाही. हे सर्व संशयास्पद असल्याचेही आमदार फरांदे यांनी म्हटले आहे.

पोलिसांची भूमिका आणि राज्य शासनाची भूमीका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांना पुढे करून सेनेने कामे करू नये. तुम्ही गुन्हा नोंदवला म्हणूनच हे झाले असल्याचे सांगत आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केले.

सेनेच्या कार्यालयावर धाड टाका तिथे नक्कीच दगड, काठ्या सापडतील. 24 तासात हल्लेखोरांना अटक होऊन जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असेही आमदार फरांदे यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या